झारखंडमध्ये मंगळवारी पहाटे दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाला. झारखंडमधील साहिबगंज येथे हा अपघात झाला सून दोन मालगाड्यांची टक्कर झाली आहे. एका रिकाम्या मालगाडीला कोळशाने भरलेल्या मालगाडीने धडक दिली आहे. या भीषण धडकेत दोन्ही मालगाड्यांचे इंजिन फुटले आणि आग लागली.
अपघात कसा घडला?
ही संपूर्ण घटना साहिबगंज जिल्ह्यातील बरहेत पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या फरक्का-लालमाटिया एमजीआर रेल्वे मार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फरक्काहून येणारी रिकामी मालगाडी बरहेत एमटी येथे उभी असताना लालमाटियाकडे जाणाऱ्या कोळशाने भरलेल्या थ्रूपास मालगाडीने जोरदार धडक दिली. ही घटना पहाटे ३:३० वाजताची आहे.
मालगाडीच्या इंजिनला लागली आग
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील साहिबगंज येथे दोन मालगाड्यांमध्ये टक्कर झाली, त्यानंतर मालगाडीच्या इंजिनला आग लागली. ही मालगाडी कोळसा वाहून नेत होती. अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचे लोको पायलटसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सीआयएसएफ जवानही जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दोन लोको पायलटांचा दुःखद मृत्यू
झारखंडमधील साहिबगंज येथे झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात दोन लोको पायलटसह तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार ते पाच रेल्वे कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींवर सध्या सामुदायिक आरोग्य केंद्र बरहेत येथे उपचार सुरू आहेत. घटनेनंतर प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.