---Advertisement---

दुर्दैवी! वादळापासून बचावला घेतला कंटेनरचा आडोसा, मात्र घडलं विपरीत

---Advertisement---

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच अवकाळीच्या आलेल्या जोराच्या वादळामुळे उभा कंटेनर पलटी होऊन दोन जणांचा  जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील चिंचोली गावाजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

तालुक्यातील चिंचाली गावाजवळ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकाचा कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून गेल्या जानेवारीपासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या ठिकाणी बिहार राज्यातील काही मजूर दोन महिन्यांपासून काम करत आहे. गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अवकाळी वादळ सुरू झाले. आलेल्या मोठ्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतू वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड देखील उडाली. त्यामुळे शेडमधील मजूर हे पटांगणात उभा असलेल्या कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला.

दरम्यान, सुसाट वेगाने सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे कंटेनर देखील पलटी झाला. यामध्ये दोन जणांचा  जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी असून जखमीला तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

यांचा मृत्यू 

या कंटेरनखाली भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह.मु. पुणे हे दोघे दाबले गेल्याचे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अफरोज आलम (वय-२३) रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार हा जखमी झाला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment