---Advertisement---

भारतासोबत आम्हाला युद्ध नको, शांतता हवी, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अझरबैजानमध्ये स्पष्टोक्ती

---Advertisement---

भारताशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहेत. आम्हाला युद्ध नको, संघर्ष नको केवळ शांतता हवी आहे. आम्ही भारतासोबत शांततेने काश्मीर, पाणी आणि दहशतवाद सारख्या मुद्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी अझरबैजान येथील दौऱ्यावेळी म्हटले.

अझरबैजानमधील लाचिन येथे झालेल्या पाकिस्तान-तुर्की-अझरबैजान त्रिपक्षीय शिखर परिषदेत शरीफ म्हणाले, आम्ही भारतासोबतच शांततेने सर्व प्रश्न सोडविण्यासाठी तयार आहे. सिंधू जल करार, काश्मीर प्रश्न आणि दहशतवादाच्या मुद्यावर शांततेने चर्चा करण्याची आमची भूमिका आहे. काही मुद्यांवर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे आणि ते संवादाद्वारे सोडवले पाहिजेत.

काश्मीरचा संदर्भ देत ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार तो सोडवला पाहिजे. जर भारताला दहशतवादाविरुद्ध प्रामाणिकपणे बोलायचे असेल तर पाकिस्तानही त्यासाठी तयार आहे. त्यांनी भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याची इच्छाही व्यक्त केली. तथापि, भारताने आधीच स्पष्ट केले आहे की व्याप्त काश्मीर परत घेणे आणि दहशतवादाच्या मुद्यावरच पाकिस्तानशी वाटाघाटी करेल.

दहशतवादी हल्ल्यात ९० हजार लोकांचा बळी

शरीफ यांची पाकिस्तानला जगातील दहशतवादाचा सर्वात मोठा बळी असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, गेल्या काही दशकांमध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादाने ९०,००० लोकांचा बळी घेतला आहे आणि १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान केले आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावर टीका केली आणि म्हटले की भारताने सिंधू पाणी कराराचे शस्त्रीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, जो पाकिस्तानच्या २४ कोटी लोकांसाठी महत्त्वाचा आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment