पत्नी प्रियकरासोबत सतत बोलायची, पती कंटाळला आणि नको तो निर्णय घेतला

बीड : जिल्यातील गेवराईतील रुई गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २२ वर्षीय युवकाने उंदीर मारण्याचे औषध घेऊन आत्महत्या केली आहे. लग्नानंतरही पत्नी सतत बॉयफ्रेंडसोबत बोलयाची तिला अनेकदा समजवण्याचा प्रत्यन केला होता, तरी ती तिच्या सवयीत कोणताही बदल करत नाही होती. त्यामुळे पतीनेच स्वतः आपलं जीवन संपवलं आहे. तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी तलवाडा पोलिसात पत्नीसह एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम महेमूद शेख  असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

सलीम याचा २५ मे २०२३ रोजी अर्धामसला येथील तरुणीसोबत विवाह करण्यात आला होता. पण लग्न झाल्यापासून ती सतत तिच्या प्रियकरासोबत फोन  वरती बोलायची  सलीम  त्याने अनेकदा तिला समजावून सांगितले होते. बऱ्याचदा सांगून देखील पत्नीच्या सवयीत काहीच बदल झाला नाही.त्याने या गोष्टीचा पाठपुरावा त्याचा संशय खरा ठरला.

त्यामुळे सलीमने  राहत्या घरी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध घेतले त्याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान पोलिसात गुन्हा दाखल प्रियकर किरण पिंपळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी किरण पिंपळे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.