---Advertisement---

धक्कादायक : बारा वर्षाच्या संसारानंतर घरगुती वादातून महिलेने केली आत्महत्या

by team

---Advertisement---

जळगाव : घरगुती वादातून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नशिराबाद येथे घडली. पती सोबत झालेल्या किरकोळ करणानंतर पत्नीने स्वतःला संपविले. पती – पत्नीमध्ये घरगुती वाद झाला, या वादानंतर पती घरातून निघून गेले. मात्र , बारा वर्षांपुर्वी प्रेमविवाह केलेल्या सारीका डिगंबर वाघुळदे (वय ३०, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या विवाहितेने विषारी औषध प्राशन केले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना तीचा दुर्देवी मृत्यू ओढवला. ही घटना शनिवारी ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास नशिराबाद येथे घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे सारिका वाघुळदे या पती व दोन मुलांसह राहत होत्या. शनिवारी ३१ मे रोजी दुपारी सारिका यांचा पती डिगंबर यांच्यासोबत काही कारणावरून वाद झाला. नंतर मालवाहू रिक्षाचालक असलेले डिगंबर हा घराबाहेर निघून गेला. यावेळी सारीका हि एकटीच होती. यावेळी त्यांनी संतापाच्या भरात विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्यांच्या शेजारच्यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच सारीका वाघुळदे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सारिका व डिगंबर यांचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. कौटुंबिक वादातून सारिका वाघुळदे यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांना दोन लहान मुल असून त्यांच्यावरील मातृछत्र हरपले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment