---Advertisement---

भारताकडे जगाचे लक्ष, जागतिक आर्थिक वाढीचे मुख्य इंजिन बनेल

---Advertisement---

२०२५ आणि २०२६ मध्ये भारत जागतिक आर्थिक वाढीचे मुख्य इंजिन असेल, अशी शक्यता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या आऊटलुक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांच्या सर्वेक्षणावर आधारित हा अहवाल आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता असूनही भारताच्या मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टी आणि आशावादी दृष्टि कोनाचा यात उल्लेख करण्यात आला आहे.

दक्षिण आशिया आर्थिक विस्ताराबाबत सर्वात आशावादी आहे. विशेषतः या प्रदेशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला
भारत विकासाचे प्रमुख इंजिन बनण्यास सज्ज असल्याचे दिसून येते, असे डब्ल्यूईएफने म्हटले आहे. दक्षिण आशिया काही आव्हानांना तोंड देत आहे.

यात बदललेल्या चिनी निर्यातीचा परिणामाचा समावेश आहे. पण, तरीही सकारात्मक चिन्हे दिसत असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय व्यापार करारामुळे भारताच्या व्यापार दृष्टिकोनाला चालना मिळाली. अशा प्रकारच्या आर्थिक घडामोडींमुळे अर्थतज्ज्ञांचा भारतावरील विश्वास आणखी दृढ झाला आहे.

२०२६ मध्येही भारत ठरेल वेगवान अर्थव्यवस्था

आर्थिक वर्ष २०२६ मध्येही देश जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहण्यासाठी सज्ज आहे. असे भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी सांगितले. चलनवाढीचा सौम्य अंदाज आणि मंदावलेला जीडीपी विस्तार यामुळे चलनविषयक धोरण भविष्यात विकासाला आधार देणारे ठरेल, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment