---Advertisement---

भारतात जिहाद सुरू राहणार की रामराज्य सुरू राहणार हे तुम्हीच ठरवा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

by team
---Advertisement---

खरगोन : आज भारत इतिहासाच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. भारतात जिहाद सुरू राहणार की रामराज्य सुरू राहणार हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुमच्या एका मताने मोफत रेशन, मोफत उपचार याची हमी दिली आहे. तुमच्या एका मताने तरुणांचे भविष्य घडवले आणि भरपूर संधी निर्माण झाल्या. तुमच्या एका मताने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते आज खरगोनमध्ये निवडणूक रॅलीला  संबोधित करत होते.

काँग्रेसचे इरादे किती भयंकर आहेत, त्यांची कारस्थाने किती घातक आहेत. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या लोकांचे ऐकावे लागेल जे 20-20, 25-25 वर्षे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते होते आणि हे लोक आता दणका देत काँग्रेस सोडत आहेत. आता त्यांचेच ऐका, एका महिलेने सांगितले की, राम मंदिरात गेल्यावर त्यांच्यावर इतका अत्याचार झाला की, तिला काँग्रेस सोडावी लागली. आणखी एका व्यक्तीने सांगितले की ‘काँग्रेसला मुस्लिम लीग आणि माओवाद्यांनी पकडले आहे. ‘तिसऱ्याने आणखी एक खोल षड्यंत्र उघडकीस आणले, ‘काँग्रेसच्या राजपुत्राचा राम मंदिराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याचा इरादा आहे.’ तुमच्या एका मताने भारत पाचवी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनला. तुमच्या एका मताने भारताचा जगात दबदबा वाढला. तुमच्या एका मताने 70 वर्षांनंतर कलम 370 हटवले. तुमच्या एका मताने आदिवासी मुलीला राष्ट्रपती बनवले आहे. तुमच्या एका मताने भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवले. काँग्रेसने निर्माण केलेली पोकळी भरून काढत भाजप सरकारने मध्य प्रदेशला नवी आणि अभिमानास्पद ओळख दिली आहे. मी आज विकसित भारताच्या संकल्पासाठी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. नर्मदेच्या तीरावर राहणारा माणूस मागणाऱ्याला कधीच निराश करत नाही, ही प्रवृत्ती शतकानुशतके सुरू आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment