---Advertisement---

दुर्दैवी ! नुकताच झाला होता साखरपुडा, मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव

---Advertisement---

जळगाव : नुकताच साखरपुडा झालेल्या तरुणाने मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात जीव गमावल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना धुळे तालुक्यातील अवधान शिवारात घडली. इन्साफ आजाद खान (२२, अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील रहिवासी इन्साफ खान या तरुणाने त्याचा मित्र मयूर गांगुर्डे यास बुडताना वाचविताना स्वतःचा जीव गमावला. इन्साफ व मयूर मोहन गांगुर्डे (वय २५, दोन्ही रा. अमळनेर) हे दोघे धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. दोघेही मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता अवधान शिवारातील धरणावर गेले होते.

यावेळी मयूरचा तोल गेल्याने तो धरणाच्या पाण्यात बुडू लागला. हे पाहून इन्साफने त्याला हात देत बाहेर काढले; मात्र हे करीत असताना इन्साफचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला. इन्साफने मित्राला तर पाण्यातून बाहेर काढले परंतु तो स्वतः बुडाला. यावेळी इतरांनी धाव घेत त्यासही पाण्यातून बाहेर काढले. पण तो बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी सात वादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नेहमी अभ्यासात पुढे असणारा इन्साफ, मैत्री आणि जबाबदारी या मूल्यांमध्येही तितकाच पुढे होता. त्याची निस्वार्थ मैत्री आजच्या समाजाला अनुकरणीय आदर्श देऊन गेली आहे. सर्वार्थाने चांगला असलेल्या आणि चांगले काम करण्यासाठी पुढे झालेल्या इन्साफला नियतीने मात्र इन्साफ न दिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नुकताच झाला होता साखरपुडा

काही दिवसांपूर्वीच इन्साफचा साखरपुडा झाला होता. लग्न आणि संसाराचे स्वप्न पाहत असतानाच नियतीने घात केला. त्याच्या पश्चात आई- वडील आणि भाऊ अरबाज असा परिवार आहे. वडील आजाद खान हे येथील मुंदडा बिल्डर्समध्ये जेसीबी ठेकेदार आहेत तर भाऊ अरबाज हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment