अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात ! सहा जण जागीच ठार

अहमदनगर: जिल्ह्यतील कल्याण-नगर महामार्गावर २४ जानेवारी बुधवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या  एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची एकत्रित धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी या अपघातासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, कल्याण – नगर  महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांच्यात ढवळपुरी फाट्या जवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक झाली. यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे