एकमेकांशी सात जन्माच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमी युगलाने, जीवनयात्रा संपवली

भुसावळ :  एकमेकांशी सात जन्माच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमी युगलाने किरकोळ वादातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरातून हळहळ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, की, शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव (वय २३)याचे काजल गौतम सपकाळे (वय २०) या तरूणीवर प्रेम होते.

या दोघांनी एकमेकांच्या सोबतीने राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाह करणार होते.  शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशन केला. तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले.

दरम्यान,काजलच्या निधनाची वार्ता ताच कुणाल मनोज भालेराव याने थेट तापी नदीचा पुल गाठून तेथून खाली उडी मारत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशीरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. संसारवेल बहरण्यापूर्वीच या तरूण युगलाचा करूण अंत झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.