औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का ?

xr:d:DAFe8DR0y38:2481,j:4440973134849772015,t:24040509

महाराष्ट्र :  जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत होतो, तेव्हा सावरकरांविरुद्ध काँग्रेसने अपशब्द वापरले, त्यावेळी हिंदुत्वाच्या नावावर मते मागणारे गप्प बसले होते. त्यांना सावरकर नको औरंगजेब चालतो, हे लक्षात आले. आम्ही बंड केल्यानंतर औरंगजेबाचा जयजयकार, तर सावरकरांचा अपमान करण्याचा विक्रमच ठाकरे गटाच्या नेत्यांनी केल्याचा आरोप रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यातून केला. शिंदे म्हणाले, जे काम पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांत केले, ते काँग्रेसने साठ वर्षांत केले नाही.

आम्ही विकासावर ही निवडणूक लढवत आहे. अटल सेतू, मुंबईतील मेट्रो ही कामे मोदींनी केली. लोकांच्या मनातील आलेल्या सरकारमुळे कामे मार्गी लागली आहेत. आमचे सरकार येण्याआधी त्यांच्या अहंकारामुळे कामे अडकली होती. त्यांनी मुंबईकरांसाठी काहीही केले नाही.

मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर परत मुंबईत आणणे हेच आमचे व्हिजन आहे, विकास हाच आमचा मुद्दा आहे. काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलते, त्याचप्रमाणे आता उद्धव ठाकरे सुद्धा तेच भाषा बोलत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहे, धनुष्यबाण कोणाकडे आहे, याचा विचार जनतेने करावा. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हाच आमचा अजेंडा आहे.