जळगावच्या मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्वाची अपडेट ; वाचा काय आहे

जळगाव । महाराष्ट्रात वेळेआधी दाखल झालेला मान्सून जळगाव जिल्ह्यात कधी पोहोचेल याची प्रतीक्षा लागली आहे. मात्र अशातच हवामान खात्याने महत्वाची माहिती आहे. जळगावात मान्सूनने एंट्री केली असल्याची माहिती हवामान खात्याने ट्विटकरून दिली आहे. मान्सून दाखल झाला असाल तरी जळगावकरांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

यंदा केरळासह महाराष्ट्रात मान्सूनने वेळेआधी एंट्री मारली आहे. राज्यातील अनेक भागात मान्सूननं व्यापला असून यामुळे राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागानं मान्सूननं कुठंपर्यंत प्रवास केला आहे याची माहिती दिली. हवामान विभागानं जारी केलेल्या नकाशानुसार नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. गुजरातमधील नवसारी, महाराष्ट्रात जळगाव, अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत मान्सून दाखल झाला आहे. तेलंगणामध्ये सर्व राज्यभरात मान्सूनचं आगमन झालं आहे. छत्तीसगडमध्येही मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. बिजापूर, सुकमा मलकनगिरी, विझिंग्राम आणि इस्लामपूर जवळ मान्सून पोहोचला आहे.

जळगावात मान्सून दाखल, पण पावसाची प्रतीक्षा…
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जळगावात मान्सून दाखल झाला असला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसापासून जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु आज गुरुवारही पहाटपासून ढगाळ वातावरण होते. सध्या ढगाळ वातावरणामुळे काल बुधवारी जळगावचे तापमान ३५ अंशावर आले. यामुळे जळगावकरांना उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळालं. मात्र आता पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

आज राज्यातील या जिल्ह्यात पावसाचा इशारा :
आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर १४ जूनपासून राज्यात पावसामध्ये काही खंड पडण्याची शक्यता वर्तवलीआहे.मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता आहे. तर धाराशिव, लातूर, बुलडाणा, पुणे, नगर, सोलापूर, अकोला, अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.