महाराष्ट्रात सायंकाळी 5 पर्यंत झाले 48.66 टक्के मतदान

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवार, 20  मे रोजी पार पडले. आज मुंबईंत सिनेकलाकार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी सरसावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मुबईच्या 6 व उर्वरित महाराष्ट्रातील 7 अशा एकूण 13 जागांसाठी मतदान झाले. सकाळी 7 वाजवपासून सुरु झालेले मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के झाले.

लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

मुंबई उत्तर – 46.91 टक्के
मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के
मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के
मुंबई दक्षिण – 44.22 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के
ठाणे – 45.38 टक्के
धुळे- 48.81 टक्के
नाशिक – 51.16 टक्के
दिंडोरी- 57.06 टक्के
भिवंडी- 48.89 टक्के
कल्याण – 41.70 टक्के
पालघर- 54.32 टक्के