सकाळी ९ च्या भोंग्याला आता कसं वाटतंय? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांना खोचक सवाल

मुंबई : हरियाणामध्ये भाजपने बहुमत मिळवत विजयाची हॅट्रिक पार केली. दरम्यान, महाराष्ट्रातही या विजयाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले कि सकाळी ९ च्या भोंग्याला आता कसं वाटतंय? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हरियाणाच्या जनतेने विश्वास दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला फेक नॅरेटिव्हने हरवलं होतं. ज्यादिवशी हे लक्षात आलं त्यादिवशी आपण महाराष्ट्रासह देशभरात या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याचं ठरवलं. पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती.”

“हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे काही लोक काल रात्रीपासूनच स्क्रिप्ट लिहून बसले होते. सकाळी ९ वाजता बोलणारा भोंगा रात्रीपासून स्क्रिप्ट तयार करुन बसला होता. काय काय बोलू आणि काय नाही असं त्यांना वाटत होतं. मला त्यांना विचारायचं आहे आता कसं वाटतंय? जनतेशी बेईमानी करुन निवडून आलेल्या लोकांना आता जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आज हरियाणात जे घडलं ते येत्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातही पाहायला मिळणार आहे,” असेही ते म्हणाले.