---Advertisement---
जळगाव : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातुन तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तिथे वाघला येथे प्रकल्प उभारण्याची मागणी केली मात्र, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सदर मागणी फेटाळून लावत पाणी देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यामुळे आधीच पाण्याचे दुर्भिक्ष व वाढती पाण्याची तूट असणाऱ्या मन्याड परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वैजापूर तालुक्यातील वाकला परिसरात तापी खोऱ्याकडे म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पात जे पाणी वाहून जातं त्यावरती चांदेश्वरी हा प्रकल्प प्रस्तावित आहे. सदर प्रकल्प स्थळी पाणी उपलब्धता 2.3 दशलक्ष घनमीटर आहे आणि जो प्रस्तावित वापर संबंधित प्रकल्पासाठी मागणी आहे तो 2.01 दशलक्ष घनमीटर आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये वाकला आणि परिसर कायम दुष्काळी असलेला हा भाग आहे. 2013 ला राज्य जल आराखडा तयार झाला परत 2018 ला त्याचे पुनर्नियोजन झालं आणि या दोन्ही आराखड्यामध्ये 2013 च्या आणि 2018 च्या आराखड्यात चांदेश्वरी वाकला ता. वैजापूर या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रास्तावित करण्यात आलं. जेव्हा हा प्रस्ताव छत्रपती संभाजी नगरच्या जलसंपदा कार्यालयाकडून नाशिककडे पाठवला गेला तेव्हा मात्र त्या ठिकाणी उत्तर असं आलं की संबंधित प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पांतर्गत येत असल्याकारणाने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही. जर राज्य जल आराखड्यामध्ये या ठिकाणी पाणी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या या प्रस्तावाला पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे आणि हे पाणी वैजापूर तालुक्यासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार बोरणारे यांनी विधानसभेत केली.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव तालुक्यातील मण्याड प्रकल्प हा आधीच १३.९ दशलक्ष घनमीटर पाण्याच्या अतीतुटीचा प्रकल्प आहे. तसा अहवाल देखील तापी पाटबंधारे महामंडळाने दिला आहे. सदर प्रकल्पावर अनेक पाणीपुरवठा योजना व शेती सिंचन अवलंबून आहे आणि त्यामुळे या प्रकल्पात वैजापूर तालुक्यातील येणार पाणी देता येणारच नाही, असे सांगितले.
अतितुटीच्या मन्याड प्रकल्पात गिरणा धरणाचे पाणी नदीजोड कालव्याद्वारे टाकण्याची यापूर्वीच मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली असून त्यादृष्टीने सर्वेक्षण देखील झालं आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील 22 गावांच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.