जळगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

---Advertisement---

 

जळगाव : तालुक्यातील सर्व मंडळात शुक्रवार 15, शनिवार 16, रविवार 17 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेत पिके तसेच घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येऊन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य शेतकरी व नागरिक यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन मंगळवारी (१९ ऑगस्ट ) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

सलग तीन दिवस ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्याने शेत पिके तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासन स्तरावर तलाठी,सर्कल, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी आदींचा मार्फत तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत शासनाला कळवावे. जळगाव तालुक्यातील पीक विमा मंजूर करण्यात यावा व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

यावेळी शिवसेना उपनेते गुलाबरावजी वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनावणे, शेतकरी अशोक खंडू बडगुजर, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, गुलाबराव कांबळे, डॉ.रमाकांत कदम, सचिन चौधरी, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, योगेश पाटील, विजय बांदल, हनु पठाण, किरण ठाकूर व पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---