---Advertisement---
इंदापूरमध्ये विहिरीचं काम सुरु असताना माती खाली पडून चार मजूर अडकले होते. त्या चारही मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता, त्यानंतर 2 तासाने आणखी दोन मजुरांचे मृतदेह सापडले आहेत. तब्बल 67 तासाने आणखी दोन मृतदेह सापडले. तर 70 तासांनंतर चौथ्या मजुराचाही मृतदेह सापडला आहे. त्यामुळे अखेरीस 70 तासांनंतर एनडीआरएफचं शोधकार्य थांबवण्यात आलं आहे.
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना मंळवार, १ रोजी मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत बेलवाडी गावातील चार मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले हाेते. आज (शुक्रवार) दुपारी चाैघा मजूरांचे मृतदेह हाती लागल्यानंतर ते थांबविण्यात आले.
या दुर्घटनेतील पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता. त्यानंतर दीड तासाने अन्य दोन मजुरांचा तसेच तासाभराच्या अंतराने चाैथ्या मजूराचा मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागला. सर्व मृत कामगार इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावचे आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32), जावेद अकबर मुलाणी (वय 30), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय 30) आणि मनोज ऊर्फ लक्ष्मण मारुती सावंत (वय 40) यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत देण्याची घाेषणा केली.









