---Advertisement---
केदारनाथ अपघातासह मागील काही दिवसात देशभरात विमानांच्या उड्डाणांबाबतच्या अनियमिततांना गांभीर्याने घेत नागरी उड्डयन महासंचालनालय अर्थात डीजीसीएने काही नियमांमध्ये संशोधन केले आहे. यासंदर्भातील निर्देश विमान कंपन्यांना लगेचच जारी करण्यात आले आहेत.
प्रतिकूल हवामानामुळे अपघाताची शक्यता वाढते. ही बाब लक्षात घेऊन डीजीसीएने म्हटले आहे की, वैमानिकांनी दृश्य संकेतांची आपल्या उपकरणांद्वारे तपासणी केली पाहिजे. जेणेकरून त्यांना विमान उडविण्याच्या कामात अधिक सुस्पष्टता आणि अचूकता येईल. बरेचदा पावसामुळे किंवा अन्य कारणाने धावपट्टी ओली असते.
---Advertisement---
अशावेळी धावपट्टीची दृश्यमानता नीट असावी. यामुळे विमान उतरताना किंवा उड्डाण भरताना त्रास होणार नाही. वातावरणातील बदलाच्या अनुषंगाने विमान चालक दलाने जास्तीत जास्त खबरदारी घेतली पाहिजे. सुरक्षाविषयक नियमांचे कठोरपणे पालन व्हायला हवे.
प्रतिकूल स्थितीत वैमानिकांनी विमानाची दिशा बदलविणे किंवा परत येणे असे मार्ग अवलंबिले पाहिजे. प्रतिकूलतेमध्ये गंभीर कंपनी, वादळी वारे, बर्फ साचणे, मोठे वादळ किंवा अचानक दृश्यमानता कमी होणे अशा सर्व मुद्यांचा समावेश आहे. अशा स्थितीत खबरदारीचे पारंपरिक उपाय अवलंबिले पाहिजे. वादळाच्या ढगाखालून विमान नेणे टाळले पाहिजे.
यातून संभाव्य अपघात टाळता येतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वैमानिकांनी हवामानाशी संबंधित सूचनांना महत्त्व दिले पाहिजे. प्रतिकूल स्थितीत केबिन क्रू आणि प्रवाशांना विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने संवाद साधला गेला पाहिजे, असेही डीजीसीएने म्हटले आहे.