Cyber ​​Security : देशात सायबर सुरक्षेत महाराष्ट्र सर्वात अव्वल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे गेला आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शुक्रवारी, नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचे उद्धाटन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे देशातील सर्वात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर आहे. देशातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान इथे एकत्रित करण्यात आले असून येथे कुठल्याही प्रकारचे सायबर अटॅक आणि फसवणूतिचे गुन्हे  यामाध्यमातून थांबवता येतील आणि अपराधींना शिक्षा देता येईल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र सायबर सिक्युरिटीमध्ये देशात सर्वात पुढे गेला आहे. कुठल्याही प्रकारचे सायबर गुन्हे थांबवण्यासाठी या सेंटरचा फायदा संपूर्ण देशाला होणार आहे.”

Bahrain Temple : बहरीनमधील २०० वर्षे जुने वारसा असलेले ‘हिंदू मंदिर’

“यावेळी १४४०७ हा एक नंबरसुद्धा लॉन्च करण्यात आला आहे. या नंबरद्वारे सायबर गुन्हेगारी संदर्भात एखाद्या व्यक्तीला सगळी मदत करता येणार असून. हा नंबर सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांकरिता एक उपाय म्हणून पुढे येत आहे,” असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.