मुंबई : पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आत उतरलेल्या पाच मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नागपाडा येथे समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडालीय.
मुंबईतील नागपाडा येथे पाण्याची टाकी साफ करण्यासाठी मजूर टाकीत उतरले मात्र, त्यांना जीव गुदमरल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले.
या मजुरांना तातडीने अग्निशमन दलाच्या मदतीने मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषीत केले.
दरम्यान, हे पाचही कामगार कंत्राटी असल्याची माहिती समोर येत आहे.