अपघातात पती गेल्याचा विरह सहन न झाल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

तरुण भारत लाईव्ह न्युज मेहरुणबारे (जळगाव) : पती अपघातात गेल्याचे दुःख सहन न झाल्याने बहाळ (रथाचे) येथील उज्ज्वला पाटील (वय ३०) या मनाने प्रचंड खचल्या. १६ डिसेंबरला पहाटे साडेसहाच्या सुमारास विषारी औषध सेवन करून त्यांनी आपली जीवनयात्रासंपविली .

सविस्तर वृत्त असे कि,

बहाळ येथून लिंबू भरून मालवाहू वाहन १० डिसेंबरला रात्री दहा वाजेच्या दरम्यान सुरतकडे जात होते. चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दहिवद फाट्याजवळ ट्रकने या वाहनाला धडक दिली. या अपघातात ट्रकचालकासह संदीप रामभाऊ पाटील (वय ३२, रा. बहाळ रथाचे) यांचा अपघातात मृत्यू ) झाला होता. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पतीच्या विरहाचा धक्का

सदर अपघातात संदीप पाटील यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. संदीप पाटील हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा त्यांचा छोटासा परिवार होता. पती अपघातात गेल्याने उज्ज्वला या मनाने प्रचंड खचल्या. पतीचा विरह सहन न झाल्‍याने पतीच्या मृत्यूच्या अवघ्या सहा दिवसातच त्‍यांनी १६ डिसेंबरला पहाटे साडेसहाच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी चाळीसगाव येथे आणत असतानाच त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. सात दिवसाच्या अंतराने पती व पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांची ७ व ९ वर्षांची दोन चिमुकले मुले आई- वडिलांविना पोरकी झाली आहेत.