---Advertisement---

भोंगामुक्त महाराष्ट्र अभियान राबवा, बांगलादेशी रोहिंग्यांची बेकायदेशीर प्रमाणपत्रे रद्द करा : किरीट सोमय्या

---Advertisement---

राज्यभरात भोंगामुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्याची घोषणा केली. सोबतच जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या राहत असलेल्या बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांविरोधात कठोर कारवाई करावी तसेच त्यांना देण्यात आलेली खोटी जन्म प्रमाणपत्रे तातडीने रद्द करा, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक करीत सोमय्या म्हणाले, मुंबई भोंगामुक्त झाली आहे, आता राज्यातील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याची वेळ आली आहे. ध्वनी प्रक्षण विरोधी कायदा सर्वांसाठी समान आहे.

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात मंडळांना परवानगी लागते, मग मशिदींनी परवानगी न घेता भोंगे वाजवणे हा कायद्याचा अवमान आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदारांनी खोट्या कागदपत्रांवर ३०० हून अधिक जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याचा आरोप करीत, किरीट सोमय्या म्हणाले की, बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लीमांना बनावट कागदांवर आधार व जन्म दाखले देण्यात आले आहेत.

मंत्रालयाच्या आदेशानंतरही आतापर्यंत १३०० बेकायदेशीर प्रमाणपत्रे परत घेण्यात आलेली नाहीत. मलकापूर येथे बेकायदेशीर दाखल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, यासंदर्भात त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. मशिदींवरील भोंगे आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी काही राजकीय नेत्यांवरही अप्रत्यक्ष टोले लगावले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---