---Advertisement---

भारताने खूप झोडपले, हवाई संरक्षण यंत्रणा द्या, पाकिस्तानची अमेरिकेकडे याचना

---Advertisement---

‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. पाकिस्तान आणि व्याप्त काश्मिरात कारवाई करीत अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंर पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देत ११ लष्करी तळ उडवले. यानंतर भारताने खूप झोडपले आम्हाला हवाई संरक्षण यंत्रणा द्या, अशी याचना पाकिस्तानने अमेरिकेकडे केली आहे.

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या ११ सदस्यीय पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळाने सार्वजनिकरीत्या अमेरिकेकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची मागणी केली. अमेरिकेने हवाई संरक्षण यंत्रणा आणि लढाऊ विमान विकावे अशी गळ पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मलिक यांनी घातली. पाकिस्तान सरकार आपल्या नागरिकांना या युद्धात भारताचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची खोटी माहिती सातत्याने देत आहे.

मात्र, अमेरिकेत गेलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळाने जाहीररीत्या भारताकडून सडकून मार खाल्ल्याची कबुली दिली आहे.
समाज माध्यमावर पाकिस्तानी मंत्री मलिक यांची एक चित्रफीत आली आहे. भारताच्या ८० लढाऊ विमानांनी एकाचवेळी हल्ला केला आणि ४०० क्षेपणास्त्रे डागली. त्यातील काही तर अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम होती, असे मलिक म्हणत असल्याचे दिसले

आमच्यासोबत काय झाले, हे तुम्ही पाहिलेच असेल. आमच्याकडे हवाई संरक्षण यंत्रणा नसती, तर पाकिस्तानात प्रचंड मलबा झाला असता. भारत वापरत असलेले तंत्रज्ञान अतिशय प्रगत आहे. त्यामुळे ते तंत्रज्ञान आम्हाला द्या. आम्ही ते तुमच्याकडून खरेदी करू, असे मलिक यांनी या चित्रफीतीत म्हटले आहे.

शाहबाज यांच्या दाव्याचे पितळ उघडे

मलिक पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वातील पथक सध्या अमेरिकी अधिकारी आणि खासदारांशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेत आहे. त्यांनी अमेरिकेकडे केलेल्त्या याचनेमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या मोठमोठ्या दाव्यांचे पितळ उघडे पडले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment