Jalgaon News: भरधाव ट्रकने दोघा दुचाकीस्वारांना चिरडले, गुन्हा दाखल

भुसावळ शहरातील खडका चौफुलीवर भरधाव ट्रकने चिरडल्याने दोघा दुचाकीस्वारांचा जागीच करुण अंत झाला होता. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला होता. अपघातप्रकरणी ज्ञानेश्वर ममराज राठोड (४०, सुभाषवाडी, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक श्याम बाबू (५५, आग्रा, उत्तरप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.

जागीच दोघांचा ओढवला मृत्यू जळगावकडे दीप नगर निघालेल्या दुचाकी (एम.एच.१९ डी. एन. ०६०८) ला पाठीमागून भरधाव वेगाने आलेला ट्रक (आर.जे.११ जी.ए.९९०३) ने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील जितेंद्र सवजी राठोड (३८, सुभाषवाडी, जळगाव) व प्रकाश उखा तव्वर (४५, डोहरीतांडा, ता.जामनेर) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, दोघा दुचाकीस्वारांचा मेंदूच अपघातात बाहेर आला तर ट्रकच्या.

पुढील भागात दुचाकी अडकर्ल जमाव मारहाण करीत या भीती ट्रक चालकाने सुसाट वेगाने पळवत नेला मात्र नशिराबादन जी ट्रक चालकाला पकडण्यात यंत्रणेल यश आले. ट्रक चालक श्याम बा (५५, आग्रा, उत्तरप्रदेश) या अटक केल्यानंतर त्यास बाजारपे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त क्रेनद्वारे दुचाकी बाहेर काढल्यानंत ट्रक बाजारपेठ पोलिसांनी ताब्या घेतला. दरम्यान, अपघातात ठा झालेल्या दोघांच्या मृतदेहाचे ट्राम् सेंटरमध्ये शवविच्छेदन केल्यानंत शुकवारी शोकाकुल वातावरणा अंत्यसंस्कार करण्यात आले.