Jalgaon News: रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव:  शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवाशी असलेल्या राजू भोई या तरुणाचा वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनजवळ घडली. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठल नगर भागात गोपाल राजू भोई हा युवक आपले दोन भाऊ व आई सोबत राहतो. तसेच तो ठेकेदारीचा व्यवसाय करत होता. बुधवारी २४ जानेवारी रोजी रात्री जेवण करून घराबाहेर निघाला होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गोपालचा मृतदेह सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनलगत आढळून आला. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी  तालुका पोलीसांनी दिल्यानंतर, आधारकार्डव्दारे गोपालची ओळख पटविण्यात आली. याच ठिकाणी गोपाली दुचाकी देखील आढळून आली.

जळगाव तालुका पोलिसांनी पंचनामा करून गोपालचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आणण्यात आला. प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.