Jalgaon News : विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव:  पिण्याचे पाणी भरण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार चालू करतांना विजेच्या धक्का लागल्याने  ३० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना मंगळवार रोजी दुपारी २ वाजता घडली आहे.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप हिरामण भालेराव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात संदीप भालेराव हा तरूण आपल्या आई, पत्नी, दोन मुलांसह वास्तव्याला होता. सेक्यूरीटी गार्डची खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता घडली, संदीप याने पिण्याचे पाणी भरण्यासाठी ईलक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले.