---Advertisement---

Jalgaon News : महापालिकेचा डोलारा निम्म्या कर्मचाऱ्यांवर उभा ! आकृतिबंध मंजूर; पण १४ वर्षांपासून भरतीच नाही

---Advertisement---

Jalgaon News : शहरातील वाढती लोकसंख्या, विस्तारते नागरीकरण आणि वाढणाऱ्या नागरी समस्या या पार्श्वभूमीवर जळगाव म हापालिकेच्या प्रशासनावर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असून, जवळपास निम्म्याच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण महापालिकेचा डोलारा चालतो आहे. परिणामी अनेक विभागांतील कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असून, नागरिकांच्या सेवांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

जळगाव महापालिकेचा आकृतीबंध शासनामार्फत मंजूर आहे. त्यानुसार महापालिकेत दोन हजार १५७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९१७ पदे रिक्त असून केवळ एक हजार २१३ कर्मचारी कार्यरत आहेत. गत मे महिन्यात २७ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. तर डिसेंबरपर्यंत सेवानिवृत्तांची संख्या ही १५० पर्यंत जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. महापालिकेत सुमारे ५० टक्के जागा रिक्त आहेत. याचा थेट परिणाम स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरी सुविधा, कर संकलन, बांधकाम परवाने, आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत सेवा देणाऱ्या विभागांवर होत आहे.

सन २०११ पासून भरती नाही

जळगाव महापालिकेत सन २०११ पासून एकाही पदाची नवीन भरती करण्यात आलेली नाही. त्या काळापासून काळापासून अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत, तर काही जण अन्यत्र बदली झाले आहेत. पण त्यांच्या जागी नवीन भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या १४ वर्षांपासून भरती बंद असल्याने मनुष्यबळाचा मोठा तुटवडा भासू लागला आहे.

विभागांवर मोठा ताण

स्वच्छता विभागात सफाई कामगारांची कमतरता असून त्यामुळे शहरातील अनेक भागात नियमित साफसफाई होत नाही. पाणीपुरवठा
विभाग, पाइपलाइन दुरुस्ती, लीकेज शोधणे, नवीन नळजोडणी यासाठी मोजकेच कर्मचारी उपलब्ध आहेत. आरोग्य विभागात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही. वसुली विभाग घरपट्टी, पाणीपट्टी यासारख्या करांच्या वसुलीसाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने महसूल संकलनात घट होत आहे. महापालिकेच्या मनुष्यबळाच्या कमतरतेचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. तक्रारींचे वेळेवर निराकरण होत नाही. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनामध्ये हलगर्जीपणा दिसतो, तसेच आरोग्यविषयक उपाययोजना कमी होत असत्याची तक्रार नागरिकांमधून केली जात असून यासंबंधी मोठी नाराजी आहे.

ठेकेदारी माइतीवर विसंबून कारभार

कर्मचारी कमतरतेमुळे महापालिकेने अनेक कामांसाठी ठेकेदारी पद्धतीचा अवलंब केला आहे. स्वच्छता, कचरा संकलन, उद्यान देखभाल, रस्त्यांची डागडुजी यासाठी खाजगी कंपन्यांकडून कामे करून घेतली जात आहेत. मात्र यामध्ये खर्च अधिक असून गुणवत्तेचा अभाव दिसून येतो. काही वेळा ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे कामात ढिसाळपणादेखील दिसून येतो.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment