जळगावात टंचाईची दाहकता, टँकरची शंभरी पार

जळगाव : गेल्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहीत होउ शकले नाहीत, परिणामी परिसरातील विहीरी व जलाशयांची पातळी देखील खालावलेली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात टँकरवारीने शंभरी पार केली असून 82 गावांसाठी 101 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्यास तालुकास्तरावरील नगरपरिषदा व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या मागणीनुसार पाणीटंचाई निवारणार्थ आगामी एक दोन दिवसात बिगर सिंचनसाठी चौथे व शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

गेल्या 2023 च्या मान्सूनमध्ये जिल्ह्यांतील पूर्व भागातील अभोरा, मंगरूळ, सुकी, गुळ, तोंडापूर लघू मध्यम प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प पाणलोट क्षेत्रात अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे पाण्याची आवक होउ शकलेली नाही. याचा फटका चाळीसगाव तालुक्यासह अन्य तालुक्यांना बसला मोठ्या प्रमाणात बसला आहे.
सरासरी दिड टक्के बाष्पीभवनाचा वेग
जिल्ह्यातील तापमानात बरीच वाढ झाली असून सुमारे 44 ते 46 अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्याचा बाष्पीभवन देखील सुमारे दिड टक्के वेगाने होत आहे.

21 व  22 मे
हतूनर 37.10 35.06 टक्के उपयुक्त जलसाठा असून 1000क्यूसेक चे आवर्तन सांडव्याव्दारे दिले जात आहे.
गिरणा 20.77 20.71 टक्के दोन दिवसांत 2000 क्यूसेक आवर्तन  सोडण्यात येणार आहे.
वाघूर 63.88 62.90 टक्के

एकूण 35.14 34.48 टक्के आजचा उपयुक्त साठा
गतवर्षी याच दिवशी हतनूर 53.73, गिरणा 24.36 तर वाघूर 66.89 असा सरासरी 41.94 टक्के उपयुक्त जलसाठ्याची नोद होती.

अंजनीची मृतसाठ्याकडे वाटचाल
जिल्ह्यात गिरणा, हतनूर व वाघूर असे तीन मोठे तसेच 13 मध्यम आणि 96 लघू प्रकल्प आहेत. दिवसेंदिवस वाढते तापमान पहाता लघू मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यात मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती व हिवरा या प्रकल्पात शून्य टक्के साठा असून अंजनी प्रकल्पात 2.52टक्के म्हणजे जवळजवळ मृतसाठ्याकडे वाटचाल झालेली आहे. तर बहुळा प्रकल्पात 11.88आणि तोंडापूर 15.87 टक्के अशा अल्प प्रमाणात उपुयक्त जलसाठा आहे. याशिवाय गुळ, मोर, मंगरूळ, अभोरा, सुकी या प्रकल्पात 50 टक्क्यांच्या जवळपास जलसाठा आहे.

टँकरची शंभरी पार
जिल्ह्यातील विविध तालुक्यात पाणीटंचाई असलेल्या गावांची संख्या 82 वर पोचली असून टंचाई निवारणासाठी 101 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वात जास्त चाळीसगाव 33 गावे 46 टँकर, अमळनेर 20 गावे 27 टँकर, जामनेर 12 गावे 9 टँकर, जळगाव 5 गावांसाठी 7 टँकर, भुसावळ 1-1 पारोळा 5-5, भडगाव 6-6 असा पाणीपुरवठा केला जात आहे.
137 गावांसाठी 157 विहिरींचे अधिग्रहण
यासोबतच जामनेर 14-14, धरणगाव 13-14, एरंडोल 6-7, भुसावळ 2-2, रावेर 1-1, मुक्ताईनगर 7-7, बोदवड 1-1, पाचोरा 7-7, चाळीसगाव 38-47, भडगाव 2-2, अमळनेर 31-37, पारोळा 12-12 तर चोपडा 3 गावांना पाणीपुरवठ्यासाठी 6 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, जामनेर या तालुक्यात टंचाई असून जळगाव या तालुक्यात देखील पाणी टंचाई जाणवत आहे. चाळीसगाव तालुक्यात विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राम्हणशेवगे, घोडेगाव, हातगाव, भिल्लवस्ती, पिंप्री बुद्रुक.प्र.दे., खराडी, डोण दिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभुज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोंदे प्र.दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा 1, वाघळी इंदिरानगर व लक्ष्मीनगर.
भडगाव-तळबंद तांडा, वसंतवाडी, आंचळगाव, मळगाव, वडगाव बु.वस्ती, धोत्रे.
अमळनेर-तळवाडे, शिरसाळे बु, निसर्डी, लोणपंचम, नगाव खु, देवगाव देवळी, सबगव्हाण, आटाळे, पिंपळे खु.चिमणपुरी, डांगर बु, नगाव बु, आर्डी अनोर, गलवाडे बु, लोणचारम तांडा, पिंपळे बु, चोपडाई, कावपिंप्री, कोंढावळ,
पारोळा- खेडीढोक, हनुमंतखेडे, कन्हेरे, चहुत्रे वडगाव प्र.अ, मंगरूळ,
जामनेर-रोटवद, मोरगाव, काळखेडे, एकुलती बु, एकुलती खु, वाडी, ओझर बु, ओझर खु, हिंगणे न.क., वाकोद, जांभोळ, किन्ही,
जळगाव- वराड, लोणवाडी बु, सुभाषवाडी, शिरसोली, कुसुंबे खु.
भुसावळ- कंडारी

गिरणा प्रकल्पातून नगरपालिका व तालुका प्रशासनाच्या मागणीनुसार सद्यस्थितीत बिगर सिंचनचे चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. स्थानिक नगरपालिका प्रशासन व ग्रामीण पाणीपुरवठा प्रशासनाने वेळेनुसार पाणीपुरवठा करावा. पाणी टंचाई लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांनी देखील अंगणात पाणी मारणे व वाहने धुणे आदी प्रकार टाळावेत.

आयुष प्रसाद,

जिल्हाधिकारी जळगाव