---Advertisement---

तळोदा येथे मोकाट गुरांचा वाढला उपद्रव, नागपालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी

---Advertisement---

तळोदा : शहरात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मोकाट गुरांमुळे अपघात होण्याची शक्यता असून नगरपालिकेने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

शहरात विविध परिसरांत मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. यात मुख्य रस्ता, देशपांडे स्टुडिओ परिसर, सोनार गल्ली, भाजी मार्केट, बडरी काॅलनी रोड, शहादारोड, भगवान बिरसा मुंडा चौक, चिनोदारोड व बस स्टॅन्ड परिसर आदींचा समावेश आहे. या ठिकाणी मोकाट गुरे रस्त्यांवर बसलेली किंवा आपसात भांडतांना दिसत असतात. तळोदा शहरातील बरेचशे गुरांचे मालक आपल्या गाय, वासरू मोकाट सोडून देतात. यामुळे शहरात मोकाट गुरांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात ठीक ठिकाणी या मोकाट गुरांची दहशत पाहावयास मिळत आहे. शहरातील अरुंद मुख्य रस्त्यावरच गुरे कळपात उभी किंवा बसलेली असतात. यामुळे शाळकरी मुलं-मुली, महिला, नागरिक व वाहनधारक यांना या मोकाट गुरांचा नेहमीच अडथळा होत असतो.

---Advertisement---

शहरात रात्रीच्या वेळी सुद्धा हे मोकाट गुरे रस्त्यावरच बसलेले असतात. काही ठिकाणी लाईट बंद असल्यामुळे ही बसलेली जनावरे वाहनचालकांना दिसत नाही. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच तळोदा नगरपालिकेकडे मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी कोंडवाडा नसून या गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत नाही किंवा सूचनाही देण्यात येत नाही. पूर्वी पालीकेचा गुरांच्या कोंडवाडा होता. त्यात मोकाट फिरणाऱ्या गुरांना कोंडून त्यांच्या मालकांकडून नगरपालीका दंड वसूल करत होती. परंतु, कोंडवाडा आता अस्तीत्वात नाही. यावर पालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने या मोकाट गुरं सोडणाऱ्या मालकांचे चांगलेच फावले आहे.

नगर पालीकेने या मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरुन दुसऱ्यांदा आपली गुरे वाऱ्यावर सोडणार नाहीत. तरी नगरपालीकेने मोकाट गुरांमुळे शहरात काही मोठी दुर्घटना होणार नाही या दृष्टीने पाऊले उचलावी अशी मागणी शहरातून केली जात आहे. तसेच शहादा, धडगांव, अक्कलकुवा, नंदुरबार रस्त्यावरती आपली गुरे चारतात. त्यामुळे पूर्ण रस्त्यावर गुरे असल्याने वाहन चालविणे अवघड होते. बहुतेदा गुराच्या धडकेमुळे मोटर सायकलस्वार,पदचारी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वारवार या भागातील शेतकऱ्यानी तहसिलदार, नगर पालीका प्रशासनाकडे लेखी निवेदने देवू सुद्धा कुठलीही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---