---Advertisement---

कोंबडीचा झाला खून, महिलेची मागणी ऐकून पोलीसही चक्रावले, वाचा नेमके काय घडलं

---Advertisement---

सिवान (बिहार) : सिवान जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि हास्यपद घटना समोर आली आहे. सोमवारी (१६ जून) एक महिला रडत रडत थेट पोलिस ठाण्यात दाखल झाली. तिने केलेल्या तक्रारीने पोलिसही काही क्षणांसाठी बुचकळ्यात पडले.

प्राप्त माहितीनुसार, रिंकी देवी नावाच्या महिलेने सिवानमधील मुफस्सिल पोलीस स्टेशन गाठले. पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश करताच रिंकी देवी रडू लागली आणि मोठ्याने म्हणू लागली की खून झाला आहे. मला न्याय हवा आहे. अशा प्रकारे रिंकी देवी पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर, प्रारंभी पोलिसांना काय झाले आहे हे कळत नव्हते. परंतु, जेव्हा त्यांनी महिलेची संपूर्ण गोष्ट ऐकली तेव्हा त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

---Advertisement---

रिंकी देवी यांनी सांगितले की, तिच्या कोंबडीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. तिच्या कोंबडीवर तिचे खूप प्रेम होते. ती तिला तिच्या मुलासारखे मानत होती. ती दररोज तिच्या कोंबडीसोबत झोपायची, पण तिचा दीर आणि नणंद सोनम आणि शीला यांनी कोंबडीचा गळा दाबून मारुन टाकले.

रिंकी देवीने पुढे सांगितले की, तिचा दीर गुड्डू दररोज मी पाळलेल्या कोंबडीची दोन अंडी खात असे. एक दिवस अंड्यावरून काही वाद झाला. त्यानंतर सोमवारी दीर गुड्डू आणि घरातील लोकांनी मिळून कोंबडीचा गळा दाबून खून केला. हे सांगितल्यानंतर रिंकी देवी पोलिस ठाण्यातच रडू लागली. तिने तिच्याच दीर आणि नणंदेवर कोंबडी मारल्याचा आरोप करीत कारवाईची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रिंकी देवीकडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर, पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की तिने आधी कोंबडी पुरून यावे. यानंतर, महिलेने कोंबडी पुरून टाकली आणि नंतर पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---