---Advertisement---

आणीबाणी : बहिणाबाई भाजप मंडळ क्र. २ अॅड. प्रविणचंद्र जंगले यांचे व्याख्यान

---Advertisement---


जळगाव : भारतीय लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा काळा दिवस म्हणून २५ जून १९७५ हा दिवस ओळखला जातो. याच दिवशी काँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादली आणि आपल्या संविधानावरच आघात केला. लोकशाहीचे चौथं स्तंभ न्यायसंस्था, प्रसारमाध्यमं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची गळचेपी झाली. सामान्य जनतेवर अन्याय झाला, हजारो निष्पापांना गुलामीसमान अत्याचार सहन करावे लागले. परंतु, या अंधाऱ्या काळातही देशात हजारो देशभक्त उठून उभे राहिले सत्याग्रह केला, तुरुंगवास पत्करला आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष केला.


या ऐतिहासिक घटनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जेष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. प्रविणचंद्र जंगले यांचे “आणीबाणी लोकशाहीचे घटनात्मक अधिकार गाेठविणारा काळा दिवस” या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान श्री सत्यवल्लभ हॉल, दिनानाथ वाडी येथे झाले.
या कार्यक्रमप्रसंगी आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींचा/ वारसांचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी पुढील प्रमाणे, सतीश प्रभाकर मदाने, गजानन पन्नालाल जोशी, प्रदीप कृष्णदास गुजराथी, श्याम नारायण कलभंडे, गोविंदराव पारचोमल रामचंदाणी, देवीबाई सिखलदास रावलानी, वंदना शरद कुळकर्णी, आनंदा हरी पांचाळ, अॅड. श्रीकांत नारायण भुसारी,व दत्तात्रय विष्णु देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.

---Advertisement---


यावेळी प्रमुख वक्ते अॅड. प्रविणचंद्र जंगले यांच्या सोबत आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी हे उपस्थित होते. प्रस्ताविक भाजप मंडळ २ च्या अध्यक्षा दीपमाला काळे यांनी केले, सुत्रसंचालन अॅड. शुचिता हाडा व गोपाळ पोपटानी यांनी आभार मानले. तसेच या कार्यक्रमाला माजी महापौर सिमा भोळे, जेष्ठ माजीनगरसेवक भगत बालाणी, मनोज काळे अमित काळे, रेखा वर्मा, सरोज पाठक, दिप्ती चिरमाडे, प्रकाश बालाणी, अॅड. विनय केसवानी, सुशील हसवानी, अविनाश नेहेते, स्वाती नेहेते व कांचन साने नंदिनी राणा, चेतन तिवारी, सतीश पाटील, रवी पाटील, संजय अडकमोल, अविनाश भोळे, ऋषिकेश शिंपी , नीरज पाटील, हेमंत चौधरी, आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---