---Advertisement---
जळगाव : शहरातील कासमवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. जुना वाद उफाळून आल्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबळ राडा झाला. यात २७ वर्षीय नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील याचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील कासमवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री जुना वाद उफाळून आल्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबळ राडा झाला. या वादात नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (२७) या तरुणावर दोन तरुणांनी धारधार शस्त्राने तीन वार केले.
या हल्ल्यात ज्ञानेश्वरच्या पोटावर, डाव्या मांडीवर व अंगावर वार झाल्याने त्याचे मूत्रपिंड फाटले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जीएमसी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन बंदोबस्त वाढवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
---Advertisement---