---Advertisement---
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील युवकाला लघवी केल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली होती व पुन्हा मारहाण करू, अशी धमकी संबंधितांनी दिल्याने तरुणाने विष सेवन केले होते. उपचारादरम्यान जळगाव येथे गुरुवारी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, अकबर वजीर तडवी असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ रोजी अकबर वजीर तडवी (वय २९) याने लघवी केल्याच्या कारणावरून वाकोद येथील सरपंच पती दीपक बाबूराव गायकवाड (४०) त भय्या मधुकर बोराडे (३०) यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली होती. तसेच धमकावून दुसऱ्या दिवशी पुन्हा मारू, अशी धमकी दिली होती.
यावरून अकबर वजीर तडवी या तरुणाने विष सेवन केले होते. उपचारादरम्यान जळगाव येथे गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पहूर पोलिसांत दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









