नशिराबाद मधील पेठ भागात दुचाकी जाळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

---Advertisement---

 

नशिराबाद मधील पेठ भागात गेल्या काही दिवसांत दुचाकींना आग लावण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांचा तपास करत नशिराबाद पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान या तिघांनी दुचाकी जाळण्याच्या प्रकारात आपला सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

या प्रकरणात रोहित दिलीप नाथ (वय ३०), विपुल गोविंदा नाथ (वय २८) आणि राकेश विजय नाथ (वय ३०) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान पेठ परिसरात घडलेल्या दुचाकी जळीत घटनांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले. संबंधित संशयितांनी या भागातील काही दुचाकींना आग लावल्याची कबुली दिल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

नशिराबाद पोलिस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, पेठ परिसरात सलग घडलेल्या दुचाकी जळीत घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---