भारत ठरणार गुंतवणुकीचा हब, पाच वर्षांत ७६ लाख कोटींची उलाढाल

---Advertisement---

 

नवी दिल्ली : जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने भारतीय अर्थव्यवस्थेवर एक अत्यंत सकारात्मक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मॉर्गन स्टॅनलेच्या मते, सध्याचे संकट भारतासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या वाढीची एक संधी बनू शकते. अहवालानुसार, भारताचे गुंतवणूक ते जीडीपी गुणोत्तर पूर्वीच्या ३६.५% च्या अंदाजावरून वाढून आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ३७.५% पर्यंत पोहोचू शकते. याचा अर्थ पुढील ५ वर्षांत अंदाजे ८०० अब्ज डॉलर्स (७६ लाख कोटी रुपये) अतिरिक्त भांडवली गुंतवणूक होईल, असा दावा करण्यात आला आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, हे गुंतवणूक चक्र भारतीय शेअर बाजाराला लक्षणीयरीत्या मजबूत करेल. जीडीपीमध्ये कॉर्पोरेट नफ्याचा वाटा वाढेल. यामुळे कॉर्पोरेट कमाईमध्ये १५% पेक्षा जास्त सीएजीआर होऊ शकतो. या गतीमुळे आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत भारतीय बाजारपेठ तिच्या कमाईच्या १० पटींपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाजही मॉर्गन स्टॅनलेने वर्तवला आहे.

भारताचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत संरक्षण खर्च जीडीपीच्या २% वरून २.५% पर्यंत वाढवणे आहे. हा उपक्रम खाजगी क्षेत्राचा सहभाग आणि मेड इन इंडिया शस्त्रांवर लक्ष केंद्रित करत आहे. डेटा लोकलायझेशन धोरणे आणि जागतिक अनिश्चिततेमुळे जागतिक कंपन्या त्यांच्या डेटा पायाभूत सुविधा भारतात आणत आहेत. भारताची डेटा सेंटर क्षमता आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत सध्याच्या १.८ गिगावॅटवरून १०.५ गिगावॅटपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने

या भारत आपल्या कच्च्या तेलाच्या ८५ टक्के आणि नैसर्गिक वायूच्या ५० टक्के गरजा आयात करतो. मध्य-पूर्वेतील संकटाने अवलंबित्वातील धोके अधोरेखित केले आहेत. सरकार आता सामरिक तेल साठ्यांचा विस्तार करणे. देशांतर्गत कोळसा उत्पादन आणि गॅसिफिकेशनला प्रोत्साहन देणे. नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि ग्रीड पायाभूत सुविधांना गती देणे, यावर काम करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---