---Advertisement---

घरातून बाहेर पडताना काळजी घ्या! जळगावसह आठ जिल्ह्यांना पुढील 3 ते 4 तास महत्वाचे

---Advertisement---

जळगाव । भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून राज्यातील काही जिल्ह्यांना महत्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पुढील 3 ते 4 तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, 30 ते 40 किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून पुढील १२ तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, तरी, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment