Union Budget 2025 in Marathi: सर्वांचे लक्ष लागून असलेला देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून यात गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या. शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प विशेष मानला जात आहे. यात शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजनेसह किसान क्रेडिटकार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर केली जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. त्यानुसार, जाणून घेऊया अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय?
2025-26 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त?
– मोबाईल स्वस्त होणार
– मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट
– LED-LCD च्या किंमती कमी होणार
– टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार
– कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री
– लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर
– गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मूलभूत सीमाशुल्क 30 टक्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करणार.
– मेड इन इंडिया कपडे स्वस्त होणार
– चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार
2025-26 च्या अर्थसंकल्पात काय महाग?
– बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी किंवा सूट दिली जाणार आहे. परंतु काही वस्तू महाग होणार आहेत, विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात.
– इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ
असे आहे अर्थसंकल्पा 2025-26 मधील मोठे निर्णय
– कापसाच्या उत्पादनासाठी 5 वर्षांचे मिशन – यामुळे देशातील वस्त्र उद्योगाला चालना मिळणार
– डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना – पुढील 6 वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर
– लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना – पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार
– बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन – छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा
– किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादेत वाढ करत ही कर्ज मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली.