---Advertisement---

नागरिकांनो, ‘घरकूल’ योजनेचा लाभ घेतला का ?, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

---Advertisement---

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना केंद्र शासनाचा पंतप्रधान घरकूल आवास योजनेचा लाभ दिला जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले नसतील तर, ३१ मेपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने किंवा ग्रामपंचायतीत सादर करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी राजू किरवे यांनी केले आहे.

ग्रामपंचायतीने योजनाकरिता नेमलेला यांच्यामार्फत पंचायत घरकुल कर्मचारी समितीत मेअखेरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत. घरकुल योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, याकरिता शासनाने दोन वेळा योजनेची मुदतवाढ दिली आहे.

आजअखेरपर्यंत तळोदा तालुक्यातून ४ हजार पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तरी संबंधित ग्रामपंचायतीने नेमलेल्या कर्मचाऱ्याकडे घरकुल योजनेच्या सर्व्हे करून घ्यावा. असे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या नियमानुसार गावातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामस्तरावर प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---