---Advertisement---
चंद्रशेखर जोशी
लव्ह जिहाद हा फंडा रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटना अधूनमधून माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. अशा प्रकारांवर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटना लक्ष ठेवून आवाज उठवत असतातच. तरही काही धर्मांध माथेफिरू डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच असा अमळनेरातील रऊफचा पराक्रम तसाच… त्यामुळे अशा व्यक्तींचे बँड वाजवलेच पाहिजेत. त्याची करामत केवढी… तो राहतो अमळनेरात… त्याने भूल देऊन जी मुलगी फसवली ती राहते चोपडा तालुक्यात. ती अल्पवयीन मुलगी… तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. केवढी ही हिंमत… हिंदीत एक शेर आहे, “दुष्टो और कांटोसे बचने के दो उपाय है, उन्हे जुतोंसे कुचल डातो. या उनसे दूर रहो.”
रऊफ बँड पथकाचा मालक असलम अली याने केलेल्या अनाचाराविरोधात चोपडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे केवळ अमळनेर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या बाबत ‘शठे शाठ्यं समाचरेत’ म्हणजे दुष्टाला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे.
याप्रकरणी असलमचा बँड वाजलाच पाहिजे, अशी तीव्र भावना जनमानसातून उमटत आहे. घटना अशी की, बँड वाजवायला असलम त्या छोट्या गावात गेला होता. मात्र त्याने तेथे या अल्पवयीन मुलीला फसविले. वास्तविक तो विवाहित असून त्याला तीन अपत्ये आहेत. याचा अर्थ निश्चितच लव्ह जिहादचाच हा प्रकार आहे. असलमने इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवत या मुलीला चोपड्यात बोलावले. तेथून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र जागरूक हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार हाणून पाडला. यापूर्वीही त्याने अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीला फसविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी धानोरा येथे बँड घेऊन गेला असता तेथे त्याने आठवीत शिकत असलेल्या मुलीला जाळ्यात ओढले. गोरगरीब हिंदू कुटुंबातील मुलींना त्यांच्या गरजा लक्षात घेऊन जाळ्यात ओढणे, त्यांचे धर्मांतरण करणे, मुर्तीना विविध आमिषे दाखवून फसविणे हे प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. असलमसारखे धर्माध नराधम ठिकठिकाणी वावरताना दिसतात.
अमळनेरातच काही महिन्यांपूर्वी एका दहशत पसरविणाऱ्या कुटुंबातील मुलाने असेच एका मुलीला पळवून नेले. तांबेपुरा भागातील हा प्रकार… स्थानिक पोलीस प्रशासन आजही या मुलीचा शोध लावू शकलेले नाही… किती हा दैवदुर्विलास… सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या लेडी डॉनचा हा मुलगा. त्याच भागातील सभ्य, सद्वर्तनी हिंदू कुटुंबातील मुलीला जाळ्यात ओढतो व पळवून नेतो… मात्र पोलीस प्रशासन आजही त्या मुलीचा शोध लावू शकलेले नाही… अन्य प्रकरणात प्रशासन कुटुंबीयांना वेठीस धरते, वारंवार चौकशीचा ससेमिरा पाठीस लागतो… मात्र त्या लेडी डॉनला हात लावण्याची हिंमत पोलीस प्रशासनात नाही? की याला काही वेगळी किनार आहे… सारे काही धक्कादायकच आहे. धुळ्यात म्हणे काही महिला येशूची पुस्तके वाटताना सापडल्या. म्हणे हे पुस्तक वाचल्याने आजार गायब होतात. केवळ वैचारिक परिवर्तन करण्याचा हा डाव हिंदू कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. असे एक ना अनेक प्रकार ग्रामीण भागात सुरू असतात. अशा प्रत्येक ठिकाणी हिंदू संघटनांचे प्रतिनिधी पोहोचतीलच असे नाही. आपली मुलगी कुणाशी संवाद साधते… यावर लक्ष ठेवण्याची पालक वर्गाची जबाबदारी नाही काय? असे प्रकार लक्षात घेता समस्त हिंदू समाजानेच जागृत रहाणे गरजेचे आहे. अमळनेर हे संवेदनशील शहर आहे. तेथे काही ‘हिरवी पिलावळ’ नेहमी डोके वर काढत असते. कधी हिरवे झेंडे हातात घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न होतो, तर कधी दगडफेकीचे प्रकार होतात. अशा घटनांना विरोध हा झालाच पाहिजे.
आजचा हिंदू दोन भागात विभागला गेला आहे. त्यातला एक गट म्हणजे हिंदुत्ववादी व दुसरा सेक्युलर… यापैकी सेक्युलर हिंदूंची संख्या बरीच आहे. त्यांना आपल्या देशावर, धर्मावर व येणाऱ्या पुढच्या पिढ्यांवर काय व किती मोठमोठी संकटे आहेत याची यत्किंचितही कल्पना नाही किंवा ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात. आपल्याला काय फरक पडतो? अशी त्यांची भावना
दिसून येते. या सेक्युलरांना जागे करण्याची गरज आहे. त्यांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. ‘दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालंकृतो ऽपिसन् । मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयंकरः।’ विद्यावान असलेल्या दुष्टांचा त्याग केला पाहिजे. मणी असलेला साप विषारी नसतो का? त्याची भीती वाटत नाही का? तुम्ही जो समतेचा मणीधारी साप कौतुकाने बघता, तो कधी दंश करेल, याचा नेम नाही. हिंदूंमध्ये आणखी एक प्रकार, म्हणजे जे काही जागृत हिंदू आहेत तेदेखील दुर्दैवाने वेगवेगळे पंथ, संप्रदाय, जात-उपजात, संत-महाराज, विविध राजकीय पक्ष, वेगवेगळ्या विचारांच्या संघटना यात विभागले गेले आहेत. परिणामी बऱ्याच जणांना हिंदूंवर होणारे अन्याय, अत्याचार, हत्या, लव्ह जिहादसारखे प्रकार याच्याशी देणे-घेणे नाही, अशीच त्यांची धारणा असते… आणि हेच सकल हिंदू समाजासाठी घातक आहे. हिंदू एकतेला याच काही अडचणी येतात. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा निवडणुकीपर्यंत मर्यादित नको… ‘एक है तो सेफ है’ हेच एकतेचे मूळ ठरावे… सारा हिंदू समाज एकत्र यावा व हिंदुत्वाला आव्हान देणाऱ्यांना, धर्मावर आघात करू पाहणाऱ्यांना वेळीच ठेचले जावे.