---Advertisement---

घटस्फोट न घेता केला दुसऱ्याशी घरोबा; महिला आता म्हणते ‘मी…’, पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात

---Advertisement---

नंदुरबार : आधीच्या लग्नाचा घटस्फोट झालेला नसताना तो झाल्याचे खोटे सांगून नागपूर येथील एका महिलेने नंदुरबारातील एका घटस्फोटित व्यक्तीशी विवाह केला. नंतर नांदण्यास नकार देत सोन्याचे दागिने घेऊन माहेरी निघून गेली. याप्रकरणी महिला आणि तिच्या आई-वडिलांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, मूळचे रांझणी येथील रहिवासी व सध्या नंदुरबारातील श्रीरामनगर भागात राहणारे पुष्पेंद्र चिंधा भारती (३९) यांचा पहिला विवाह झाला होता. काही कारणाने त्यांचा घटस्फोट झाला होता. दुसऱ्या विवाहासाठी ते समाजमाध्यमावर स्थळ शोधत असताना त्यांना नागपूर येथील एका महिलेविषयी स्थळाची माहिती मिळाली.

नंदुरबारात पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर २०२० मध्ये पुष्पेंद्र यांचा विवाह नागपूर येथील त्या महिलेशी झाला. विवाहात सोने-चांदीचे दागिने व इतर वस्तू महिलेला घेऊन देण्यात आल्या. विवाहानंतर रांझणी येथे नांदत असताना भांडण करून विवाहिता नंदुरबार येथे राहण्याचा आग्रह करू लागली. नंदुरबारातील श्रीरामनगरात राहत असताना नेहमीच भांडण करीत होती. गरोदर राहिल्यानंतर प्रसूतीसाठी नागपूर येथे गेली.

बाळ जन्मल्यानंतर मरण पावले. नंतर महिलेने नांदण्यास येण्यास नकार दिला. या महिलेची पुष्पेंद्र यांनी अधिक माहिती काढली असता त्या महिलेची आधी दोन लग्ने झाली होती. दोन्ही बाबतीत त्यांचा न्यायालयात दावा सुरू आहे. दुसऱ्या लग्नाबाबत त्यांचा घटस्फोट झालेला नाही. पुष्पेंद्र हे महिलेला नांदविण्यासाठी नागपूर येथे घेण्यास गेले असता त्यांच्याकडून १० लाखांची मागणी करण्यात आली. खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली. पहिल्या दोन जणांची जी हालत केली तीच करणार म्हणून धमकी दिली. तसेच लग्नातील सर्व दागिने ठेवून घेतले.

फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर पुष्पेंद्र भारती यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने महिला व तिच्या आई-वडिलांविरुद्ध फसवणूक आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment