---Advertisement---
धरणगाव येथे नव्याने उभारण्यात येणारे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी व्यक्त केला.
धरणगाव येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची रविवारी (१५ जून) प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यात आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
खाज्याजी नाईक यांच्या नेतृत्वाखालील आदिवासींच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, त्यांच्या त्यागमय संघर्षाची उजळणी करणारे हे स्मारक समाजप्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले. स्मारक प्रकल्पाचे भव्य उद्घाटन २० जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची अधिकृत घोषणा या वेळी करण्यात आली.
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “हा प्रकल्प केवळ ऐतिहासिक स्मृती जपणारा नाही, तर सामाजिक उभारणीचे प्रतीक म्हणून उभा राहील. शासनाच्या वतीने यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.” या प्रसंगी अनेक स्थानिक पदाधिकारी, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.