---Advertisement---

Jalgaon News : नागरिकांनो काळजी घ्या ! वातावरणात बदल, ‘या’ आजाराचे वाढले रुग्ण

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात वातावरणात बदल होत असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप, थंडीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हाभरात प्राथिमक केंद्रांमध्ये दिवसाला साडेचार हजारांहून अधिक ताप असलेल्या रुग्णांनी उपचार घेतला आहे. मागील पाच दिवसात जवळपास ३५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेतला आहे. त्यातच कोरोनाचे रूग्ण संख्याही राज्यात वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना पत्र जारी करण्यात आले आहे. दरम्यान , जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सध्या स्थितीत नाही. मात्र खबरदारी म्हणून उपाययोजना व जिल्हाभरात उपायोजांनवर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावी. तोंडाला मास्क व रुमाल बांधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले आहे.

सर्दी; खोकला, तापांच्या रूग्णांची सर्वाधिक वाढ चाळीसगाव व जामनेर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. आरोग्य विभागाने साथीचे आजार पसरू नये म्हणून पथकांची नियक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात आठवडाभराच्या काळात उपचार घेणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये औषधीचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह १५ तालुक्यात ९४ पथके साथ रोगाला आळा घालण्यासाठी कार्यरत ठेवण्यात आली आहेत. काही भागामाध्ये श्वसनविकारात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विविध कारणामुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव वाढत आहे. सध्या प्रसारीत होणाऱ्या ओमीक्रॉन प्रकारामध्ये जेएन१, एक्स.एफ.जी आणि एलएफ ७.९ या प्रकारामुळे ताप, खोकला, घसा खवखवणे हा सौम्य आजार होत असल्याचे शासनाने आरोग्य विभागाला दिलेल्या मार्गदर्शक तत्वात म्हटले श असून त्याचा शोध घेतला जात आहे.

आरोग्य विभागाने जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सध्यास्थितीत नसल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय उप जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका व नगरपरिषद रुग्णालयात सेवा सुविधांचा तयारीचा आढावा व मॉकड्रिल घेण्याबाबत शासनाकडून सुचविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल शासनाला आरोग्य विभागाला सादर करावा लागणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत डेंग्यूचे ११ रुग्ण उपचार घेत आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव नंतर नशिराबाद याठिकाणी डेंग्यू रुग्ण आढळून आल्यानंतर त्याठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण मोहिम हाती घेतली आहे. डेंग्यूच्या डासांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे डेंग्यू डासाची उत्पत्तीची स्थळे नष्ट केली जात आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment