---Advertisement---
जळगाव : महिन्याभरापूर्वी शहरातील जीर्ण व धोकादायक १०७ इमारतीच्या मालकांना महापालिकेतर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. यात त्यांना या इमारती तात्काळ रिकाम्या किंवा त्यांची दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. परंतु, महिना उलटून देखील एकाही इमारत मालकाने कोणतेही पाऊल उचलले दिसत नाही. यामुळे या इमारतींत काही वित्त अथवा जीवितहानी झाल्यास स्वतः इमारतमालक त्याला जबाबदार राहील, असा इशारा अंतिम जाहीर नोटिसीद्वारे दिला आहे.
---Advertisement---
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने एप्रिल व मे महिन्यांत शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला होता. त्यात १०७ इमारती जीर्ण व धोकादायक आढळून आल्या. या इमारती केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे २४ तासांच्या आत या इमारती खाली कराव्यात, अशा नोटिसा महापालिकेने मे महिन्यात इमारत मालकांना बजावल्या होत्या. त्यापैकी एकाही जणाने नोटिसीची दखल घेतली नाही.
सर्वाधिक ५३ धोकादायक इमारती प्रभाग समिती एक, तर ४१ प्रभाग समिती दोनमध्ये आहेत. यात माजी नगरसेवक,काय आहे कायद्यातील तरतूद महापालिका धोकादायक इमारतींच्या मालकांना ‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २६५ (अ) अन्वये नोटीस बजावते. १९५० मधील तरतुदीनुसार नोटीस दिल्यानंतर होणाऱ्या जीवित किंवा वित्तहानीस इमारत मालक जबाबदार असतो. त्यात दंडात्मक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी याच कायद्याचा आधार घेत इमारतमालकांची नावे प्रसिद्ध करून अंतिम जाहीर नोटीस जारी केली आहे.जीर्ण झालेल्या इमारती पावसाळ्यात अधिक धोकादायक ठरतात. त्या पडण्याची शक्यता वाढते.