---Advertisement---
जळगाव १८ जून शहरातील साफसफाई अन् स्वच्छतेचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. शहर स्वच्छतेचा ठोक्यासाठी भारत विकास ग्रुप या संस्थेने तीन कोटी ५८ लाखांची बँक गॅरंटी महापालिकेकडे जमा केली आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेचा ठेका देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. साधारणतः ऑगस्टपासून बीव्हीजी ग्रुप शहर स्वच्छतेचे काम सुरू करणार आहे.
शहरातील साफसफाई आणि स्वच्छतेचा ठेका वॉट्स्प्रेस या या कंपनीला देण्यात आला होता. कंपनीसंदर्भात अनेकदा वादही निर्माण झाले. या कंपनीला ठेका देण्यावरून अनेक नगरसेवकही संशयाच्या भोवऱ्यात होते. दरम्यान, या कंपनीची पाच वर्षांची मुदत संपत्याने महापालिका प्रशासनाने नव्याने निविदा मागविल्या होत्या. यात बीव्हीजी अर्थात भारत विकास ग्रुप संस्थेसह आणखी दोन जणांनी निविदा दाखल केल्या होत्या.
या प्रक्रियेत बीव्हीजी या संस्थेने महापालिकेकडे एक कोटी ५८ लाखांची बयाणा रक्कमही भरली होती. मात्र, संस्थेने बँक गॅरंटी जमा केली नव्हती. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने बीव्हीजी संस्थेने महापालिकेकडे तीन कोटी ५८ लाखांची बँक गॅरंटी जमा करून कंत्राट मिळण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
ऑगस्टपासून काम सुरू होणार
जोपर्यंत नवीन कंत्राट दिले जात नाही, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या वॉटरग्रेस कंपनीला शहर स्वच्छतेचे काम करावे लागणार आहे. कंत्राट देण्यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बीव्हीजी संस्था साधारणतः ऑगस्टपासून काम सुरू करण्याची शक्यता आहे.
वॉटरग्रेस कंपनीला पुन्हा दंड
वॉटरग्रेस कंपनीला १२ तासात शहरातीत कचरा उचलण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. मात्र, बुधवारी (१८ जून) दिवसभरात १८४ कामगारांचा पुरवठा न केल्याने आणि कचरा न उचलल्यामुळे वॉटरग्रेस कंपनीला बुधवारी पुन्हा तीन लाख ८० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
उपायुक्तांचा भार हलका
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांचा निवडणूक समितीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला आस्थापना विभागाचा भार हलका करण्यात आला आहे. मात्र, आस्थापना विभागातील गोंधळामुळेच हा पदभार आपत्याकडून काढून घ्यावा, अशी विनंती उपायुक्तांनी आयुक्तांकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे.
संस्थेसोबत महापालिकेचा करार होणार
शहरातील साफसफाईचे कंत्राट देण्यासाठी बँक गॅरंटी प्राप्त झाल्यानंतर महापालिका संस्थेला करारनामा करण्यासाठी पत्र देणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली. करारनामा झात्यानंतर बीव्हीजी संस्थेला तत्काळ कार्यादेश दिले जाणार असत्याचेही ते म्हणाले.