---Advertisement---
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन बारामतीच्या विमानतळावर लँडिंग दरम्यान हा विमानाचा भीषण अपघात झाला. यात अजित पवारांसह विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर संबंधित विमान कंपनीच्या मालकाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अपघातग्रस्त विमान व्हीएसआर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (VSR AVIATION) या कंपनीच होतं, आणि कंपनीच्या संचालक विजय कुमार सिंह यांनी सांगितले की, विमान उतरवण्याचा निर्णय पूर्णतः वैमानिकाचा होता त्यांनी आधी रनवे 29 वर विमान उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र काही तांत्रिक अडचण आली त्यानंतर रनवे 11 वर पुन्हा लँडिंग चा प्रयत्न केला आणि त्याचवेळी हा दुर्दैवी अपघात घडला. विमानाची देखभाल अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आली होती आमच्या माहितीनुसार विमानात कोणताही तांत्रिक बिघड नव्हता कोणतीही यांत्रिक अडचण देखील आढळलेली नाही. असं स्पष्टीकरण विमान कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी दिलं आहे.
प्राथमिक दृष्ट्या असं समोर आल आहे की, वैमानिकाला रनवे स्पष्टपणे दिसत नव्हता. त्या ठिकाणची दृश्य मानता कमी होती, असही यावेळी विजयकुमार सिंह म्हणाले.
सध्या आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्यासाठी ही खूप मोठी शोकांतिका आहे 2023 मध्ये झालेल्या अपघाताबाबत देखील त्यांनी भाष्य केला आहे., तो अपघात मुंबई विमानतळावर झाला होता त्यावेळी पाऊस होता आणि दृश्य मानता ही कमी होती लँडिंग नंतर विमान रनमेवरून घसरलं होतं ती घटना वेगळी होती आणि ही घटना वेगळी आहे.
विमानाच्या कृ मधील वैमानिक अत्यंत अनुभवी होते…
कॅप्टन सुमित कपूर यांना 16 हजारांहून अधिक तासांचा उड्डाणाचा अनुभव होता तो पायलट कडेही सुमारे 1500 तासांचा अनुभव होता कॅप्टन सुमित कपूर यांनी यापूर्वी सहारा एअरलाइन, जेटलाईट आणि जेट एअरवेज या विविध नामांकित विमान कंपन्यांमध्ये काम केलेलं होतं आणि ते आमच्या विमानावरही अत्यंत अनुभवी होते. कॅप्टन सुमित कपूर माझे खूप चांगले मित्र होते माझ्या भावासारखे होते आणि त्यांचा मुलगाही आमच्याच कंपनीत पायलट आहे कॅप्टन शांभवी पाठक यादेखील माझ्या मुलीसारख्या आहेत दोघेही उत्कृष्ट वैमानिक आणि अत्यंत चांगली माणसं होती अशी प्रतिक्रिया विजयकुमार सिंह यांनी दिली आहे.
दरम्यान या संपूर्ण अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक यंत्रणांकडून चौकशी सुरू असून बॅकबॉक्स आणि तांत्रिक तपासणीनंतरच अपघाताच नेमकं कारण हे स्पष्ट होणार आहे.









