---Advertisement---

धक्कादायक ! दरवाजा लावायला गेली अन् काळाने घातली झडप

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका गावांतून धक्कादायक अपघाताची बातमी समोर येत आहे. घराच्या दरवाजात विद्युतप्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून एका १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (२५ जून ) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास हातले तांडा येथे घडला . याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धनश्री साईनाथ राठोड (वय १७ वर्ष रा. हातले तांडा ता. चाळीसगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे.

धनश्री राठोड हिचे वडील साईनाथ काशिनाथ राठोड हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी ( २५ जून ) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तिच्या परिवारातील सदस्य कामावर गेले होते. तसेच धनश्रीचा भाऊ हा बाहेर गेला असता धनश्रीही दरवाजाची कडी लावायला गेली. तेव्हा अचानक दरवाज्यात विद्युत प्रवाह आल्याने धनश्रीला विजेचा धक्का बसला आणि ती बाजूला फेकली गेली.

दरम्यान, मीटरची वायर कट झाल्यामुळे हा विद्युत प्रवाह उतरला होता अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. दरम्यान, धनश्रीला कुटुंबीयांनी तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. तिच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ असा परिवार आहे. हातमजुरी करणाऱ्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखद घटनेमुळे हातले तांडा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---