---Advertisement---
पुणे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना यापुढे शाकाहारी जेवण बनवताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यापुढे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे तयार करणे, त्यांची प्रक्रिया करणे आणि शिजवणे बंधनकारक असणार आहे. या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने सूचना जारी करताना सांगितले की, अन्न सुरक्षा हे केवळ कायदेशीर मुद्दा नाही, तर ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील जबाबदारी आहे. अनेकदा एकाच ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र हाताळल्यास किंवा शिजवल्यास भेसळीची शक्यता वाढते.
त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः धार्मिक आणि नैतिक कारणांमुळे शाकाहारी लोक मांसाहारी हॉटेलमध्ये जेवण करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे शिजवावावेत, असा सूचना अन्न व सुरक्षा प्रशासनाने दिल्या आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना तात्काळ नोटीस बजावून कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे यापुढे हॉटेल व्यावसायिकांना शाकाहारी व मासांहारी जेवण तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.