मध्य प्रदेश : मध्य प्रदेशाच्या इंदूरमधील राजा रघुवंशी, मेरठ येथील सौरभ राजपूत यांच्यासह अनेक जणांना त्यांच्याच पत्नींनी प्रियकरांशी संगनमत करून कायमचे संपवले. या भीतीतून अनेकांनी त्यांच्या पत्नींचे प्रियकरांशी लग्न लावून दिल्याचे अनेक प्रकरण समोर आलेले आहेत. आता उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे एका पतीने आपल्या पत्नीच्या कृत्याने त्रस्त होऊन पोलिस ठाणे गाठले आणि सांगितले की, त्याला शांततेत जगायचे आहे.
पतीने आपल्या पत्नीवर आरोप केला आहे की, त्याची पत्नी दिवसभर त्याच्यासोबत राहते आणि रात्र होताच ती तिच्या प्रियकराकडे जाते. तो पत्नीच्या या कृत्यामुळे अनेक महिन्यांपासून त्रस्त आहे. ती घटस्फोटही देत नाही आणि त्याच्यासोबत व्यवस्थितही राहत नाही. त्याने पत्नीला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे हे कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने, त्याने अखेर पोलीस स्टेशन गाठले आणि सांगितले की, त्याला शांततेत जगायचे आहे.
पतीने पोलिसांना सांगतिले की, एका रात्री त्याने तिचा पाठलाग गेला असता, ती भाड्याच्या घरात राहणाऱ्या तिच्या प्रियकराच्या घरी गेली. गेल्या अनेक महिन्यांपासून हे चालू आहे. मी माझ्या पत्नीला घटस्फोट देण्यास सांगितले, मात्र तिने नकार दिला. अशा परिस्थितीत मला काय करावे हे समजत नाही.
ओळखण्यास दिला नकार
पतीने सांगितले की, त्याने त्याच्या पत्नीला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने त्यांचे नाते टिकवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्याची पत्नी काहीच ऐकत नाही. जेव्हा तो एके दिवशी पोलिसांना घेऊन पत्नीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओळखण्यास नकार दिला. ती म्हणाली की तू कोण आहेस आणि तू इथे का आला आहेस.