Jamner News: तरुणींनी दुर्बल न राहता सबल बनावे – श्याम चैतन्य महाराज

by team

---Advertisement---

 

Jamner News: हिंदू संस्कृती ही जगात सर्वात प्राचीन संस्कृती आहे. हिंदू संस्कृतीमध्ये नारी पूजनाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीपूजन करून आपण अष्टमीला विशेष करून कन्या पूजनाचा कार्यक्रम करतो. कन्या हे देवी स्वरूप असतात. हल्लीच्या या जगात मुलींनी आता पराठे सोबत कराटे पण शिकले पाहिजे आणि बाटी सोबत लाठी पण शिकली पाहिजे, असे प्रतिपादन श्री शाम चैतन्यजी महाराज यांनी केले. ते श्री गुरुदेव सेवाश्रम येथील चैतन्य धाम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या दुर्गोत्सवानिमित्त आयोजित कन्या पूजन कार्यक्रमात बोलत होते.    

रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी श्री गुरुदेव सेवाश्रम येथील चैतन्य धाम येथे हा कार्यक्रम पार पडला. प्रसंगी परिसरातील सुमारे ३५० कन्यांचा पूजन करण्यात आले. यावेळी कन्यांचे पाय स्वच्छ धुऊन पुसून,  त्यांचे पूजन करून भोजन व दक्षिणा देण्यात आली. यावेळी आजच्या नारीने दुर्बल न राहता सबल बनावे त्यासाठी स्वतःचे रक्षण स्वतः करता यावे याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे श्री शाम चैतन्यजी महाराज म्हणाले. यावेळी अनेक कन्या व महिलांनी मनोगत व्यक्त केले.

परिसरातील लहान मोठ्या कन्यांसह असंख्य माता-पिता यांच्यासह जामनेर नगराध्यक्षा साधना गिरीश महाजन, कमल महाजन,  उत्तम राठोड,  विजय पाटील,  किशोर नाईक, प्रा. उमाकांत पाटील, गोकुळ चव्हाण, नटवर चव्हाण,  विठ्ठल जाधव,  नीलेश चव्हाण, बन्सीलाल चव्हाण,  हरी महाजन, विकास पवार, सुनील पवार,  बद्रि राठोड,  अविनाश पवार गणेश राठोड, विश्वनाथ चव्हाण, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार चैतन्य धामचे सचिव रविंद महाजन यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---