---Advertisement---

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा, बंडखोरांनी भारतासह जगाला मागितला पाठिंबा, जनता रस्त्यावर

---Advertisement---

पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान जनता रस्त्यावर उतरली आहे. हा प्रांत स्वतंत्र झाल्याची घोषणा ज्येष्ठ बलुच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी केली आहे. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्याची मागणी मीर यांनी भारताकडे केली आहे.

बलुचिस्तानचा बहुतांश भाग बलुच लिबरेश आर्मीच्या ताब्यात आहे. आम्ही आमचा संकल्प पूर्ण केला असून बलुचिस्तानच्या लोकांनी त्यांचा निर्णय दिला आहे. बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग राहिलेला नाही. आम्ही भारतासह जगाला आवाहन करतो, की त्यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी, असे अशी पोस्ट मीर यार बलोच यांनी बुधवारी त्यांच्या समाज माध्यम केली.

यांनी बलोच पोस्टमध्ये म्हटले की, बलुचिस्तान वेगळा झाला असून आम्ही आमच्या देशाचा नकाशा जाहीर केला आहे. बलुचिस्तानी लोकांनी स्वतंत्र राष्ट्र घोषित केले आहे. जगाने आम्हाला साथ द्यावी आणि बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा द्यावा. अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, नागरिकांचे अपहरणे करणे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याविरोधात नागरिकांनी लढा दिला. बीएलए आणि नागरिकांनी पोलिस ठाणे, शासकीय इमारती आणि सैन्य तळांवर ताबा मिळविला आहे. राष्ट्र उभारणीसाठी आमच्याकडे अनेक योजना असून त्याची अंमलबजावणी केली जाईल. आता आम्ही पाकिस्तानमधून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा करीत आहे. यापुढे बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग नाही.

लाखो बलोच उतरले रस्त्यावर

लक्षावधी बलुच नागरिक रस्त्यावर उतरले आहे. आम्ही पाकिस्तानी सैन्य किंवा पोलिसाला आमच्या हद्दीत घुसू देणार नाही. जगाने पाकिस्तानच्या एकतर्फी विधानावर विश्वास ठेवू नये. बलुचिस्तान नेत्याच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आणि आंतरराष्ट्रीय किंवा तिसन्या देशाच्या सहभागाचे पुरावे देणारा एकही कायदेशीर कागदपत्र पाकिस्तान सादर करू शकला नाही. संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले की आपण आपले आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्य पुढे नेणार असल्याचे मीर म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---